Loksatta

डोकलाम-पल्याड जायलाच हवे!

  भारत आणि चीनदरम्यान भूतानच्या प्रभुत्वाखालील डोकलाम क्षेत्रात लष्करी तणाव उत्पन्न झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेले भाषण महत्त्वपूर्ण आहे. भारत-चीन संबंधांवर भाष्य करताना ‘युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही’ आणि ‘चच्रेतून प्रश्न सोडवण्यात राष्ट्रहित’ असल्याचा  त्यांचा सूर होता. दीड महिन्यांहून अधिक काळापासून डोकलाम भागात भारत व चीनचे सन्य एकमेकांसमोर …

डोकलाम-पल्याड जायलाच हवे! Read More »

एकविसावे शतक कुणाचे?

  ज्याप्रमाणे १९वे शतक हे युरोपच्या आणि २०वे शतक हे सोव्हिएत संघ व अमेरिकेच्या वर्चस्वाचे होते, तसे २१वे शतक चीनच्या वर्चस्वाचे असेल असे एक गृहीतक आहे. मात्र यासाठी चीनला विज्ञान व तंत्रज्ञान, उद्योग, लष्करी सुसज्जता यांच्याकडे लक्ष देतानाच विकासाचे नवे मॉडेल उभे करावे लागेल.. या  वर्षभरात ‘चीन-चिंतन’ या सदरात आपण चीनच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेण्याचा …

एकविसावे शतक कुणाचे? Read More »

चिनी समाज व साम्यवादी पक्ष

  चीनच्या संदर्भातील खरा प्रश्न आहे की समाजातील ज्या गटांची भरभराट झाली आहे ते साम्यवादी पक्षाचे नेतृत्व आणि कार्यप्रणाली कधीपर्यंत मान्य करणार? चीनने आíथक विकासातील तो टप्पा आता गाठला आहे जिथे समाजातील सर्वाधिक संपन्न गटांना आपले स्थान टिकवण्यासाठी साम्यवादी पक्षाची गरज उरलेली नाही. मात्र साम्यवादी पक्षाच्या म्हणण्यानुसार चिनी समाजात पक्षाचे स्थान अमर्त्य आहे.  चीनमध्ये आर्थिक सुधारणांची …

चिनी समाज व साम्यवादी पक्ष Read More »

विचारधारा ते संकल्पनांचा प्रवास

  जिआंग झेमिन व हु जिंताव प्रमाणे जिनपिंग यांची मांडणीसुद्धा वैचारिक सिद्धांताऐवजी वैचारिक संकल्पनेच्या श्रेणीत मोडणारी आहे. जगामध्ये समाजवादाचा प्रवास स्वप्नाळू मांडणी ते वैज्ञानिक विचारधारा असा झाला असला तरी, चीनमध्ये साम्यवादी पक्षाचा प्रवास मार्क्‍सवादी विचारधारा ते स्वप्नाळू संकल्पना असा उलटय़ा दिशेने घडत असल्याचे दिसते आहे. चीनच्या साम्यवादी पक्षाने अलीकडेच एका अधिकृत वक्तव्यात पक्षाचे महासचिव आणि …

विचारधारा ते संकल्पनांचा प्रवास Read More »

भारतापुढील आव्हाने व उपाययोजना

भारत- चीन संबंधांचा विचार करता चार महत्त्वाची आव्हाने आपल्यासमोर आहेत. दोन्ही देशांतील सीमावाद सोडवणे, ‘रोड आणि बेल्ट’ पुढाकारात सहभागी होण्यासंबंधी. भारतीयांना स्वत:च्या राजकीय व्यवस्थेऐवजी स्पर्धक/शत्रू राष्ट्राची राजकीय व्यवस्था अधिक चांगली वाटू लागणे हे तिसरे आव्हान आहे. चौथे मोठे आव्हान हे या देशाच्या संभाव्य अपयशातून उभे राहणारे आहे. जागतिक पटलावरील चीनच्या उदयामुळे भारतापुढे उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा …

भारतापुढील आव्हाने व उपाययोजना Read More »

नेहरूंचे काय चुकले?

  १९६२ मध्ये भारतीय लष्कराची तयारी नसताना, लष्कराला पुरेशी संसाधने उपलब्ध करून न देता नेहरू सरकारने ‘फॉर्वर्ड पॉलिसी‘ राबवली.. नेहरूंना वाटायचे की सीमेवर भारत- चीन दरम्यान चकमकी झडत राहतील, मात्र त्यातून उद्भवणाऱ्या तणावाचे रूपांतर चीनद्वारे युद्ध पुकारण्यात होणार नाही.. सन १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर सुरू झालेली भारतीय अपयशाची चिकित्सा अद्याप सुरू आहे. युद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे आसन …

नेहरूंचे काय चुकले? Read More »

१९६२ चे युद्धबंदी

  अमेरिका पूर्वी पाकिस्तानच्या पाठीशी उभा होता आणि त्याआधारे पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांना बळ मिळत असे. अमेरिकेची जागा आता चीनने घेऊ नये यासाठी भारताला विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सर्वात आधी सन १९६२ च्या युद्धबंदीच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल.. भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाचे युद्धात रूपांतर होते की काय अशी स्थिती उत्पन्न झाली असताना, या महिन्यात भारत-चीन युद्धाला …

१९६२ चे युद्धबंदी Read More »

हाँगकाँगचा लोकशाही लढा

  हॉँगकॉँग विधानसभेसाठी अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत चिनी सरकारच्या हस्तक्षेपाविरुद्ध जहाल भूमिका घेऊन जन-आंदोलन उभारणारे सहा युवक विजयी झाले आहेत. हे तरुण व त्यांच्या पिढीला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असून चिनी सरकारसाठी ही खऱ्या अर्थाने धोक्याची घंटा आहे.. ४ सप्टेंबर रोजी हाँगकाँगच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत लोकशाहीधार्जिण्या उमेदवारांच्या विजयाने चीनचे धाबे दणाणले आहे. हाँगकाँगच्या ‘लेग्को’ …

हाँगकाँगचा लोकशाही लढा Read More »

चिनी जनतेची खिलाडूवृत्ती

  बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रथम आणि रिओमध्ये मात्र चीनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेळाडूंची कामगिरी खालावली तरी चिनी जनतेने मात्र खेळाडूंना दोष न देता याचे खापर तेथील सोयीसुविधा, सदोष पंचगिरी, भोजनव्यवस्था यावर फोडले. लोकांच्या या खिलाडूवृत्तीने सरकारची चिंता मात्र मिटली.. ऑलिम्पिक पदतालिकेतील स्थान हे जागतिक पटलावरील देशाच्या तुलनात्मक शक्तीचे निदर्शक असल्याचा सार्वत्रिक समज आहे. देशातील खेळ-संस्कृती आणि …

चिनी जनतेची खिलाडूवृत्ती Read More »

चीनमधील वन व्यवस्थापन

  चीनने २०५० पर्यंतचे वनधोरण निश्चित केले असून देशातील एकूण जंगल क्षेत्रापकी सुमारे ६० टक्के भागांमध्ये वृक्षतोडीवर कडक प्रतिबंध लादण्यात आले आहेत. तसेच २००० पासून दरवर्षी सुमारे ४.७ दशलक्ष हेक्टर जमिनीवर झाडे लावण्यात आली. याची फळे आता बघावयास मिळत आहेत.. चीनच्या औद्योगिक विकासाने निर्माण केलेले पर्यावरणाचे प्रश्न सर्वश्रुत आहेत. माओच्या काळात शेतीची सामूहिक मालकी आणि …

चीनमधील वन व्यवस्थापन Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger