परिमल माया सुधाकर

११ डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर त्याचा कुठेही जल्लोष नसेल!

मध्य प्रदेश विधानसभेसाठी २८ नोव्हेंबरला मतदान आटोपल्यानंतर राज्यात भयाण राजकीय शांतता पसरली आहे. मतमोजणीला अवकाश असल्याने सत्ताधारी पक्षाद्वारे मतदान यंत्रांमध्ये छेडछाड होत असल्याच्या थोड्या बातम्या व काही अफवा वगळता राज्यात निवडणूक निकालांच्या राजकीय परिणामांची चर्चा करण्यात फारसे कुणाला स्वारस्य दिसत नाही. भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यास शिवराजसिंह चौहान यांना लोकसभा निवडणुकीपर्यंतच मुख्यमंत्रीपद मिळणार आणि नरेंद्र …

११ डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपला पुन्हा सत्ता मिळाली तर त्याचा कुठेही जल्लोष नसेल! Read More »

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे!

  छोटी शहरे व मोठी गावे ही ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीची केंद्रे! आजूबाजूच्या पाच-पंचवीस-पन्नास छोट्या गावांना, तांड्यांना, वस्त्यांना आर्थिक चक्रात गुंफत स्वत:चे हित साधणारी ही छोटी शहरे व मोठी गावे तशी सामाजिक चर्चाविश्वात थोडी दुर्लक्षलेलीच आहेत. महात्मा गांधींच्या काळात जर भारत खेड्यांमध्ये वसलेला होता, तर आजच्या काळात तो खेड्यांएवढाच महानगरांमध्ये आणि स्वत:ला शहर म्हणण्यात धन्यता …

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे! Read More »

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे!

  छोटी शहरे व मोठी गावे ही ग्रामीण भागातील आर्थिक उलाढालीची केंद्रे! आजूबाजूच्या पाच-पंचवीस-पन्नास छोट्या गावांना, तांड्यांना, वस्त्यांना आर्थिक चक्रात गुंफत स्वत:चे हित साधणारी ही छोटी शहरे व मोठी गावे तशी सामाजिक चर्चाविश्वात थोडी दुर्लक्षलेलीच आहेत. महात्मा गांधींच्या काळात जर भारत खेड्यांमध्ये वसलेला होता, तर आजच्या काळात तो खेड्यांएवढाच महानगरांमध्ये आणि स्वत:ला शहर म्हणण्यात धन्यता …

सातत्याने वृद्धिंगत होत गेलेल्या व्यापारी-भाजप संबंधांमध्ये प्रथमच कटुता निर्माण झाली आहे! Read More »

शेतमजूर व शेतकऱ्यांमधील असंतोषाचा सामना करत भाजपचा विजयरथ भोपाळला पोहोचणार?

  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून जस-जसे दूरदूर जावे, तस-तसे देशाच्या ‘इंडिया’ व ‘भारत’ फाळणीचा प्रत्यय येत जातो. राज्याच्या ‘इंडिया’ भागात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जेवढा जबरदस्त पाठिंबा मिळतो आहे, तेवढाच विरोध राज्याच्या ‘भारत’ भागात सहन करावा लागतोय. मध्य प्रदेशातील ग्रामीण भागात गावेच्या गावे अशी आहेत, ज्यांनी २०१३ च्या विधानसभेत आणि २०१४ च्या लोकसभेत भाजपला शत-प्रतिशत …

शेतमजूर व शेतकऱ्यांमधील असंतोषाचा सामना करत भाजपचा विजयरथ भोपाळला पोहोचणार? Read More »

भोपाळप्रमाणे देशाच्या जवळपास सर्वच शहरी भागांमध्ये काँग्रेस अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडते आहे!

  मध्य प्रदेशात २८ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भोपाळ शहरात भाजपचे पारडे निर्विवादपणे जड आहे. मागील १५ वर्षे सत्तेत असूनसुद्धा सरकार विरुद्ध, विशेषत: मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या विरुद्ध, शहरात नाराजीचा सूर आढळत नाही. ग्रामीण भागातील वास्तव कदाचित वेगळे असेल. मात्र मध्य प्रदेशच्या राजधानीत सर्व वयोगटांतील, तसेच सर्व स्तरांतील स्त्री-पुरुष पुन्हा एकदा भारतीय …

भोपाळप्रमाणे देशाच्या जवळपास सर्वच शहरी भागांमध्ये काँग्रेस अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडते आहे! Read More »

डॉ. हमीद अन्सारी : मोदी, मोदीभक्त आणि भाजपला न आवडलेले उप-राष्ट्रपती!

  २०१५ चा भारतीय प्रजासत्ताक दिन! वर्षानुवर्षे दूरचित्रवाणीवरून होणाऱ्या थेट प्रसारणाने देशभरातील नागरिकांच्या कौतुहूलयुक्त उत्सुकतेचा प्रजासत्ताक दिन सोहळा २०१५ मध्ये दोन कारणांनी अधिकच आकर्षक झाला होता. एकतर, भव्यदिव्य कार्यक्रम आयोजनात ज्यांचा हातखंडा अख्ख्या जगाने मान्य केला आहे, अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच प्रजासत्ताक दिन होता. साहजिकच जादूगराच्या टोपीतून कोणकोणती कबुतरे निघतील याच्या कल्पनेनेच त्यांचे …

डॉ. हमीद अन्सारी : मोदी, मोदीभक्त आणि भाजपला न आवडलेले उप-राष्ट्रपती! Read More »

साबरीमाला : मोदी ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ घोषणेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत!

  साबरीमाला प्रकरणी स्मृती इराणी बोलल्या ते बरे झाले! या निमित्ताने भाजपमधील त्यांच्यासारख्या महिला नेतृत्वाने चढवलेला आधुनिकतेचा मुखवटा गळून पडला! तसा तो भाजपच्या महिला नेतृत्वावर कधीच चपखल बसला नव्हता. मात्र मध्यमवर्गीय महिला आणि महाविद्यालयीन युवक-युवतींना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी नरेद्र मोदींच्या प्रचारचमुने जाणीवपूर्वक उमा भारतीसारख्या भगव्या वस्त्रातील नेतृत्वावरून प्रकाशझोत स्मृती इराणी आणि मीनाक्षी लेखींसारख्या महिला नेतृत्वाकडे …

साबरीमाला : मोदी ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ घोषणेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत! Read More »

‘#MeToo’ : एम. जे. अकबर संपादक असते आणि मंत्रिमंडळातील इतर कुणावर असे आरोप झाले असते, तर त्यांनी काय संपादकीय लिहिले असते?

  ‘कुणीही राजीनामा देणार नाही. हे एनडीएचे सरकार आहे, युपीएचे नाही’, अशी दर्पोक्ती केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी जून २०१५ मध्ये केली होती. पळपुट्या ललित मोदी प्रकरणात केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांचे नाव गुंफण्याच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंग बोलत होते. त्यांच्या या विधानाला …

‘#MeToo’ : एम. जे. अकबर संपादक असते आणि मंत्रिमंडळातील इतर कुणावर असे आरोप झाले असते, तर त्यांनी काय संपादकीय लिहिले असते? Read More »

शांतता नोबेल २०१८ – डॉ. डेनिस आणि नादिया : धार्मिक/वांशिक/राष्ट्रवादाच्या श्रेष्ठतेच्या संकल्पनेत स्त्रियांचे स्थान काय?

  सन २०१८ चा नोबेल शांतता पुरस्कार काँगोचे डॉ. डेनिस मुकवेगे आणि इराकच्या याझिदी समुदायाची २५ वर्षीय युवती नादिया मुराद यांना संयुक्तरीत्या जाहीर झाला आहे. या द्वारे नोबेल पुरस्कार समितीने एकीकडे डॉ. डेनिस व नादिया यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे युद्ध व संघर्षातील सर्वात भयावह घटनेकडे जगाचे लक्ष वेधले आहे. डॉ. …

शांतता नोबेल २०१८ – डॉ. डेनिस आणि नादिया : धार्मिक/वांशिक/राष्ट्रवादाच्या श्रेष्ठतेच्या संकल्पनेत स्त्रियांचे स्थान काय? Read More »

गांधी हयात असेपर्यंत इतर सर्व त्यांच्यापुढे खुजे ठरले आणि नंतरही त्यांची उंची कुणाला गाठता आली नाही!

  आजपासून (२ ऑक्टोबर २०१८) महात्मा गांधींचे १५० व्या जयंतीचे वर्ष सुरू होत आहे. सरकारी आणि गैर-सरकारी स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने हे वर्ष धुमधडाक्यात साजरे होणार यात शंका नाही. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या केंद्रस्थानी राहण्याचा मान केवळ गांधींनाच मिळाल्याने, किंवा तो टिकवून ठेवणे फक्त त्यांनाच जमल्याने, स्वातंत्र्यानंतरदेखील त्यांची मूल्ये, पद्धती आणि कृती सातत्याने चर्चेत राहिली आहे. यातून …

गांधी हयात असेपर्यंत इतर सर्व त्यांच्यापुढे खुजे ठरले आणि नंतरही त्यांची उंची कुणाला गाठता आली नाही! Read More »

RSS
Follow by Email
Telegram
WhatsApp
Reddit
FbMessenger